Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-41 | Navoday Pariksha | Utara-41

उतारा 41 

निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो. संपूर्ण वृक्ष म्हणजे साल, पाने आणि फुले यांना पुष्कळ औषधी मूल्य असते; कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यात मदत होते. ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात. पानांचा लगदा गुळाच्या खड्याबरोबर घेता येतो. जखमांच्या बाबतीत, थोडीशी पाने पाण्यात उकळवता येतात आणि नंतर हे पाणी सुसह्य तापमानाचे झाल्यावर जखमा धुण्यासाठी वापरता येते. निंबाच्या तेलाचे दोन थेंब जखमेवर लावण्यासाठी उपयोगी ठरतात. रोगप्रवणतेमुळे उठणाऱ्या पुरळांच्या बाबतीत, खाजेपासून मुक्ती मिळवण्यासाठीही निंब मदत करते. निंबाच्या बियांचा लगदा डोक्याला लावून 10 मिनिटांनी धुऊन टाकावा. त्यामुळे डोक्यात कोंडा होणे वा डोक्यावर फोड उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासही प्रतिबंध होतो. निंब हा काविळीमध्ये फार उपयोगी आहे. त्याचा रस मयातून देता येतो. कोरड्या पायांवर भेगा पडल्यास निंबाच्या पाण्यात ते बुडवून ठेवता येतात. निंबाच्या पानांचे चूर्ण धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते. नववर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचे प्रतीक म्हणून निंबाचे विशेष महत्त्व असते.

 

Post a Comment

0 Comments