Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-30 | Navoday Pariksha | Utara-30


 उतारा - 30

पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत बदल होत असतात. आज जे पाण्याखाली आहे; ते पुष्कळ वर्षांपूर्वी कदाचित समुद्राच्या वर होते. समुद्री शिंपले जे एके काळी पाण्याखाली होते, आता खूप उंचीवरच्या जमिनीवर सापडतात. हिमालयाच्या अनेक शिखरांपाशी आपल्याला अशा प्रकारचे दगड आढळतात की, जे समुद्राच्या तळाशी वसलेल्या वस्तूचे बनतात. याचा अर्थ हिमालय कधी काळी समुद्राच्या तळाशी होता. अनेक गोष्टी पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल घडवून आणीत असतात. नदया माती वाहून नेतात आणि खडक झिजवतात. वारे मोकळी रेती आणि धूळ वाहून नेतात. कधी कधी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग हळूहळू वर जातो किंवा सावकाश खाली जातो.या गोष्टी बहुतेक वेळ चालूच असतात आणि अत्यंत संथपणे पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतात. पण कधी-कधी जेव्हा भूकंप होतो; तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागात आकस्मिक बदल होतो.

Post a Comment

0 Comments