Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-19 | Navoday Pariksha | Utara-19


 उतारा-१९
प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायांशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते, अशा काळाचा विचार करणे कठीण आहे. त्याच्यापाशी ना घोडा ना उंट अगदी बैलगाडीही नव्हती. 
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांब वर प्रवास करी. माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतरच गाडी आली असावी. 
पण चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसा माणसाळवण्यास शिकला असावा. कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा. 
अशी शक्यता आहे की, त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जल वाहतुकीची कल्पना सुचली. बहुदा त्याने एखादा झाडांचा बुंधा करून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली.

Post a Comment

0 Comments