Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-7 | Navoday Pariksha | Utara-7

उतारा-७

मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशुसमान होतो. सस्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. 

आजकाल जगातील पुष्कळच्या भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रितीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत.राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत.

 

Post a Comment

0 Comments